Police Bharti 2022 : मोठी बातमी, पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर

Police Bharti 2022

मुंबई : राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी खूशखबर असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे.

आता अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

राज्यातील पोलीस भरतीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त झाल्याचे सांगितले आहे.

अर्ज, विविध दाखले सादर करण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

येत्या काही दिवसांत राज्यात सुमारे 20 हजार पोलिसांची भरती होणार असून त्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. उमेदवारांनी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे.

दरम्यान, पोलिस भरती प्रक्रियेसाठी राज्य सरकारच्या वेबसाइटवर अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.