सरकार कोणतेही असो, सरकारला समाजाच्या सोबत राहावे लागते : मोहन भागवत

Whatever the government, the government has to stay with the society: Mohan Bhagwat

अमरावती: धर्मपीठावर बसने हे औचित्य भंग आहे, धर्मा पीठावर कुणाचे पीठादी पती म्हणून नियुक्ती होत असताना त्या ठिकाणी माझे काम नाही, मंदिराच्या आत आमचं काही काम नसून, मंदिराच्या बाहेर दंडा घेवून रखवाली करण्याच आमचं काम आहे.

मंदिराच्या आतमधील गोष्टी आमच्या मर्यादेत नाही असंही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले.

आज अमरावतीमध्ये भानखेडा स्थित संत कंवर धाममध्ये गद्दीनशिणी समारोह संपन्न झाला. या समारोहात सरसंघचालक मोहन भागवत प्रमुख पाहूणे होते. यावेळी त्यांना सिंधी बांधवांनी त्यांच्याकडे सिंधी विद्यापीठाची मागणी केली.

यावेळी त्यांनी, लोक माझ्याकडे जी मागणी करतात ती मागणी मी सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम करतो, असं भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले.

‘मी संघाचा सरसंघचालक आहे. मी सरकारमध्ये जात नाही. सरकारने एकच गोष्ट माझ्यावर थोपवली आहे, ती म्हणजे सरकारने दिलेली सिक्युरिटी परंतु जेव्हा मी समाजात जातो आणि काही लोक मला काही मागणी करतात, तेव्हा मी ते सरकारकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज अमरावती येथे संत कवररामधाम येथील कार्यक्रमात बोलताना सांगितले.

सिंधी बांधवांनी सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्याकडे सिंधी विद्यापीठाची मागणी केली त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

सरकारच्या नावातच ‘स’ म्हणजेच सकारात्मकता व ‘रकार’ म्हणजे सरकार असेपर्यंत सरकार करेल, मात्र समाज एकत्र असेल आणि समाजाचा दबाव असेल तर सरकारला त्या गोष्टी करणे बंधनकारक असतं, मग ते सरकार कोणतेही असो, सरकारला समाजाच्या सोबत राहावे लागते.

समाज ठरवेल तेच सरकार राहू शकते, असंही भागवत म्हणाले. चांगला विचार करणे गरजेचे आहे. संपूर्ण समाजाने वाईट विचार केला तर त्यातून गुंडागर्दी निर्माण होऊ शकते. वाईट गोष्टी घडतात म्हणून सर्वांचे मन चांगले बनावे असंही मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले.