Maharashtra Assembly Session 2022 : भाजपाला अजून एक यश, विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर, शिवसेनेच्या राजन साळवी यांचा पराभव

Maharashtra Assembly Session 2022: Another victory for BJP, defeat of Rahul Narvekar, Rajan Salvi of Shiv Sena

Maharashtra Assembly Session 2022 | मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या राजन साळवी (Shiv Sena’s Rajan Salvi) यांचा पराभव झाला आहे. विधानसभा निवडणुकीत नार्वेकर यांना 164 मते मिळाली.

राजन साळवी यांना केवळ 107 मते मिळाली. त्यामुळे नार्वेकर मोठ्या फरकाने विजयी झाले. या विजयानंतर भाजप आमदारांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.

दुसरीकडे भाजपच्यावतीने विधानभवन परिसरात मोठी विजयी जल्लोष करण्यात आला. शिवसेना आणि शिवसेना बंडखोर यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

या संघर्षात बंडखोरांनी भाजपसोबत पहिली लढाई जिंकली आहे. आता सर्वांच्या नजरा विश्वास दर्शक प्रस्तावाकडे लागल्या आहेत.

या निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच जावई हे राज्य विधानसभेचे अध्यक्ष होणार असून त्यांचे सासरे विधानपरिषदेचे सभापती होणार आहेत, हे विशेष.

विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ (Narhari Jirwal, Deputy Speaker of the Legislative Assembly) यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली. भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील (BJP MLA Chandrakant Patil) यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

त्याला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिले. राजन साळवी यांच्या नावाचा प्रस्ताव चेतन तुपे यांनी मांडला. त्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक सुरू होताच राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी कौल मागितला.

त्यानंतर झिरवाळ यांनी प्रशासनाला मतदान प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रत्येक सदस्याची नोंदणी करण्यात आली आणि मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.

राहुल नार्वेकर यांचा विजय

या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर दणदणीत विजयी झाले आहेत. राजन साळवी यांचा पराभव झाला आहे. राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाली.

साळवी यांना केवळ 107 मतांनी समाधान व्यक्त करावे लागले. नार्वेकर 57 मतांच्या फरकाने विजयी झाले. त्यामुळे या निवडणुकीत तीन आमदार तटस्थ राहिले.

पाटील-फडणवीस जुगलबंदी

विधानसभेच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील (NCP MLA Jayant Patil) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्यात चांगलीच जुंपली.

विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरू होताच जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांचे आभार मानले. मी राज्यपालांचे आभार मानतो. गेल्या अनेक महिन्यांपासून विधानसभा याची वाट पाहत आहे.

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याबाबत आमच्या सरकारकडून वारंवार विनंती करण्यात येत होती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीही राज्यपालांची भेट घेऊन वारंवार निवेदने दिली.

त्यांना ते पटले नाही, ते कशाची वाट पाहत होते हे आज लक्षात आले. ते आधीच सांगितले असते तर कदाचित एकनाथरावांनी हे आधीच केले असते. त्यामुळे ही मागणी केल्याबद्दल मी राज्यपालांचे आभार मानू इच्छितो.

राज्यपाल हे महाराष्ट्र आणि देशासमोर कसे आदर्श ठेवू शकतात, याचे उदाहरण राज्यपालांनी घालून दिले आहे. राज्यपालांना विनंती आहे की, आता विधान परिषदेच्या 12 सदस्यांच्या नावांना मंजुरी द्यावी.

आम्ही पाठवल्याप्रमाणे मंजूर केले पाहिजे. त्यामुळे राज्यपालांनी सर्वांना समान वागणूक दिल्याचा संदेश जाईल, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस लगेच बोलायला उभे राहिले. नानाभाऊ पाटोळे (Nanabhau Patole) यांचे मी आभार मानतो. त्यांच्यामुळे आम्हाला हा दिवस पाहायला मिळाला. ते आमचे मित्र आहेत. नानाभाऊ पाटोळे मैत्रीला जागले. त्याबद्दल आभारी आहोत, असे सांगताच सभागृहात एकच खसखस ​​पिकली.