नशिबापेक्षा मेहनत महत्त्वाची, घरी बसून काहीच मिळणार नाही, मुख्यमंत्र्यांचा आता थेट निशाणा

Hard work is more important than luck, nothing will be achieved by sitting at home, the Chief Minister is now a direct target

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी एकमेकांवर थेट आरोप न करता अप्रत्यक्षपणे एकमेकांना चिमटे काढले.

मात्र आता शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील मतभेद वाढत असून थेट आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीपासूनच शिंदे गटाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कोणाचीही भेट न घेतल्याचा ठपका ठेवला आहे.

त्यामुळे घरी बसून काहीही मिळणार नाही, त्यासाठी मेहनत महत्त्वाची आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

शिवाय मुख्यमंत्रीपद हे सहजासहजी मिळत नसून त्यामागील मेहनतीचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनीच आपल्या आमदारांना पक्षप्रमुख आणि ठाकरे कुटुंबावर टीका करू नका, अशी सूचना केली होती.

मात्र, दरम्यानच्या काळात या दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप वाढले आणि आता जहरी टीका सुरू झाली आहे.

शिवसेनेने बंडखोर आमदारांना कायम गद्दार ठरवले आहे, तर शिंदे गटाने पक्षप्रमुखांवर कोणाचीही भेट घेतली नसल्याचा आरोप केला आहे.

केवळ मुख्यमंत्रीच नाही तर शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांनीही आता पक्षप्रमुखांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. घरी बसून काही मिळत नसल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर केली आहे.

केवळ नशिबाला दोष देऊ नका, मेहनतही तितकीच महत्त्वाची आहे. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता कठोर परिश्रम केल्यास फळ मिळेल, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला आहे.

आपल्याला मुख्यमंत्रिपदाची आशा नव्हती पण हे आपल्या मेहनतीचे फळ असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे घरी बसून काही मिळणार नाही, असे म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

एखाद्याला क्षमा करणे इतके सोपे नाही. क्षमा केल्याने काहीही साध्य होऊ शकते, पण तो गुण नसेल तर काय होऊ शकते हे संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. क्षमा करण्यासाठी मोठे मन लागते, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.