5G मुळे देशात इंटरनेट क्रांती, मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर : पंतप्रधान मोदी

5G Internet Revolution in Country

5G Internet Revolution in Country : आज 130 कोटी भारतीयांना 5G च्या रूपाने एक अद्भुत भेट मिळत आहे. 5G नवीन युगात प्रवेश करत आहे. ही अनेक संधींची सुरुवात आहे. यासाठी मी प्रत्येक भारतीयाचे अभिनंदन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात 5G सेवा सुरू केली. 1 ऑक्टोबरपासून दिल्लीतील प्रगती मैदानावर 4 दिवसीय इंडिया मोबाईल काँग्रेसला सुरुवात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G सेवेचा शुभारंभ केला. यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी घेतली अमित शहांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

पूर्वी देशाला परदेशातून मोबाईल आयात करावे लागत होते, मात्र आता देश मोबाईल फोन निर्यात करत आहे. मोबाईल फोन निर्मितीमध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आत्मनिर्भर भारताने हे केले आहे, असेही मोदी म्हणाले.

1ऑक्टोबर 2022 हा 21 व्या शतकातील भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे. 5G तंत्रज्ञानामुळे दूरसंचार क्षेत्रात क्रांती होणार आहे.

नवा भारत हा केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक असणार नाही, तर त्या तंत्रज्ञानाच्या विकासात आणि अंमलबजावणीत भारत सक्रिय भूमिका बजावेल. भविष्यातील या तंत्रज्ञानामध्ये भारताची मोठी भूमिका असेल.

2G, 3G, 4G च्या काळात भारत तंत्रज्ञानासाठी इतर देशांवर अवलंबून होता. पण 5G ने भारताने नवा इतिहास रचला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने हर घर जल अभियानाप्रमाणे प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याची मोहीम सरकारने सुरू केली होती. तसेच उज्ज्वलच्या माध्यमातून गरीबातील गरीबांच्या घरी गॅस सिलिंडर पोहोचवले.

त्याचप्रमाणे आमचे सरकार सर्वांसाठी इंटरनेट या ध्येयाच्या दिशेने काम करत आहे. देशातील गरीब लोकही नवीन तंत्रज्ञान वापरण्यासाठी नेहमीच पुढे येतात हे मी पाहिले आहे. आता तंत्रज्ञान खऱ्या अर्थाने लोकशाही बनले आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

हे देखील वाचा