Science Fact : हिंदू धर्मात शतकानुशतके अस्तित्वात असलेल्या अनेक परंपरा आहेत आणि आजही पाळल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही परंपरांबद्दल सांगणार आहोत ज्या आजही जिवंत आहेत आणि लोक त्यांचे पालन करतात.
पूर्वीच्या काळात जेव्हा भारतात सभ्यता फोफावत होती तेव्हा त्यांची मुख्य गरज पाणी ही होती आणि ती मुख्यतः शेती, स्वयंपाक, पिण्यासाठी इत्यादीसाठी वापरली जात होती.
त्यामुळे त्यांना तलाव, नद्या इत्यादी पाण्याच्या ठिकाणी रहावे लागत होते. त्यामुळे त्यांचे तांबे वापरण्याचा मार्ग पाणी शुद्ध करण्यासाठी केल्याची शास्त्रीय माहिती नसली तरी तांबे घाण स्वतःकडे खेचून घेते आणि नदी किंवा तलाव शुद्ध करण्यासाठी वापरले जात होते.
काहीजण व्यापाराच्या उद्देशाने देखील प्रवास करीत होते. तेव्हा तांब्याची किंवा चांदीची नाणी वापरली जात होती. बहुतेक चलन आजच्या स्टेनलेस स्टीलच्या नाण्यांप्रमाणे अतिशय प्रचलित तांब्याची नाणी चलनात होती.
तांबे हा मानवी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असा एक महत्त्वाचा धातू आहे आणि त्याचा उपयोग पाण्यातील व शरीरातील घाण शुद्ध करण्यासाठी केला जातो.
वास्तविक, प्राचीन काळी सोने, चांदी आणि तांबे धातूची नाणी होती. तांबे धातू शुद्धीकरणाचे काम करते. त्यामुळे नदीचे पाणी शुद्ध होऊन नदीचे पाणी पिण्यायोग्य व्हावे म्हणून लोक तांब्याची नाणी नदीत टाकत असत. मात्र, आता तांब्याची नाणी बंद करण्यात आली आहेत. पण तरीही नदीत नाणी फेकण्याची परंपरा कायम आहे.
तांबे पाणी शुद्ध करते असा आयुर्वेदात उल्लेख आहे. तांब्याच्या भांड्यांमध्ये पाणी साठवून पाणी पिले तर दूषित डायरियाजेनिक बॅक्टेरिया नष्ट करते.
आपण मंदिरात पाहिले असेल पुजारी तीर्थ/पवित्र पाणी देण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा वापर करतात. अनेकदा आपण अशा गोष्टी करतो की त्यामागील खरे कारण आपल्याला माहीत नसते.
प्रथा समजून घेऊन आपण या गोष्टी पाळतो. पण त्यामागील तर्क आपल्याला कळत नाही. तुम्ही पाहिले असेल की अनेक लोक नदीजवळ गेल्यावर नाणी टाकतात. नदीत नाणी फेकण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे.
हे थोडे विचित्र दिसते, परंतु त्यामागे एक पौराणिक आणि वैज्ञानिक तर्क आहे. हा ट्रेंड आजचा नाही तर फार पूर्वीपासून चालू आहे.
मग नदीत नाणी का फेकायची?
ज्या काळात नदीत नाणी फेकण्याची प्रथा सुरू झाली त्या काळात तांब्याची नाणी वापरली जात. पाणी शुद्धीकरणासाठी तांब्याचा वापर केला जातो, आरोग्य आणि कुणाला तरी अप्रत्यक्ष मदत केल्याची भावना यामागे आहे. यासाठीच जेव्हा लोक नदी किंवा तलावाजवळून जातात तेव्हा त्यात तांब्याचे नाणे त्यात टाकतात.
धार्मिक कारण
ज्योतिषशास्त्र सांगते की जर लोकांना कोणत्याही प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळवायची असेल तर त्यांनी नाणी आणि काही पूजा साहित्य पाण्यात टाकावे.
तसेच वाहत्या पाण्यात चांदीचे नाणे टाकल्यास दोष नाहीसे होतात. खरं तर, बरेच लोक असा विश्वास करतात की नाणे फेकणे चांगले नशीब आणते.
व्यावहारिक कारण
आधी पैशाला महत्व होते, नदीकाठी राहणाऱ्या लोकांना अनेक संकटाचा सामना करावा लागत होता. नदीवर अनेकांची गुजराण असते. त्यांना आर्थिक मदत व्हावी. आप आपल्या पद्धतीने दान धर्म करताना अप्रत्यक्ष दान केल्याची भावना रहावी, हा देखील हेतू होता.